भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याबरोबरच समृद्ध आणि संपन्नतेच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. भारताचा आर्थिक विकास सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करत आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार, देशात सोन्याचा साठा उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे लक्षात येते. दुसरीकडे डीमॅट खाती आणि स्टार्टअपची संख्या वेगाने वाढत आहे. हे सकारात्मक चित्र निर्माण होत असताना आणि सर्वत्र आर्थिक […]
Category: बातमी
Revolutionary Lahuji Vastad | क्रांतिकारक लहुजी वस्ताद !
भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर क्रांतिवीरांनी आपले प्राण देशाला अर्पण केले, त्यात क्रांतिवीर गुरुवर्य लहुजी राघोजी वस्तादसारख्या महान क्रांतिकारकाचे स्थान वरचे आहे. लहुजींचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी नंतरच्या काळात लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती. शौर्यशाली कामगिरीमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ ही पदवी दिली. लहुजींचे […]
Reduced use of ATMs | वर्षभरात देशातील ४ हजार एटीएम बंद
डिजिटल पेमेंट (Digital Payments) वाढीस लागल्याने वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण देशात एकूण ४ हजार एटीएम बंद झाल्याची खळबळजनक आकडेवारी आहे. भारतात डिजिटल अर्थव्यवस्था (digital economy) वेगाने वाढत चालली आहे. अनेक जण व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. परिणामी रोख रकमेचा वापर आता कमी प्रमाणात होऊ लागला आहे. याचा मोठा परिणाम हा […]
देशात २८% लोक साध्या गणितातही कच्चे !
देशातील १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २८ टक्के लोकांना साधी वाक्ये कशी लिहायची, वाचायची ते येत नाही. साधी बेरीज- बाकीही त्यांना येत नाही. तथापि, यातीलच १५ ते २४ वयोगटाचा रिपोर्ट मात्र समाधानकारक आहे. या वयोगटात अशा वर्गाचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. (National Sample Survey – 2022-23) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणच्या २०२२-२३ […]
Talking in sleep : झोपेत बोलण्यामागे असतात ‘ही’ कारणे !
मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू आपल्या शरीराला कार्य करण्यास मदत करतो. उदाहरण संवाद साधणं, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं तसेच उठण्या- बसण्यापर्यंतही सगळ्या गोष्टींसाठी मेंदू संकेत देतो की, आपण आता हे करायला हवं. कोणतीही क्रिया करताना अनेकदा आपण विचार करतो तर अनेकदा काही गोष्टी पुढच्या सेकंदाला घडतात […]
Yogi Adityanath: ‘माझ्यावर नाही तर हैदराबादच्या निजामावर रागावा, योगी आदित्यनाथ यांनी केली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर जोरदार टीका
Yogi Adityanath: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात (Maharashtra Assembly Election) सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील अचलपूर येथे पार पडलेल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रॅलीला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन […]
Usha Uthup | मर्दानी आवाजाची पॉप सम्राज्ञी उषा उत्थुप
आपला देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी मुंबईत एका दाक्षिणात्य कुटुंबात (८ नोव्हेंबर १९४७) गायिका उषा उत्थुप यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते. त्यांच्या आईला संगीताची खूप आवड असल्याने घरात काहीसं संगीताचं वातावरण होतं. आई छंद म्हणून गायचीही. विशेष म्हणजे पन्नासच्या दशकातही त्यांच्या घरात विशिष्ट प्रकारचंच नव्हे तर […]
महाराष्ट्रात कोण जिंकणार? महायुती की एमव्हीए, मतदानापूर्वी सर्वेक्षण
वऱ्हाडवृत्त् Maharashtra Election Survey: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी सर्व 288 जागांवर मतदान होणार आहे. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी झारखंडसह महाराष्ट्रात आणि इतर पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होतील. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत आहे. आता एक सर्वेक्षण समोर आले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार परत येऊ शकते असा […]
Anti-Sikh riots case : शीखविरोधी दंगलीप्रकरणी टायटलरविरोधातील हत्येचा खटला सुरूच राहणार : उच्च न्यायालय
नवी दिल्ली : 1984 च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित खटल्यातील काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधातील खुनाचा खटला सुरूच राहणार असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांनी टायटलरच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला, ज्यामध्ये त्यांनी दिल्ली न्यायालयात त्यांच्याविरुद्ध चालवण्यात येत असलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती केली होती. […]
ISKCON | इस्कॉनवर भारतात बंदी घालावी, जगन्नाथ पुरीतून उठली मागणी;
गोवर्धन खंडपीठानेही नाराजी व्यक्त केली अमेरिकेतील ह्युस्टन येथे अवेळी रथयात्रा आयोजित करण्याबाबत गोवर्धन पीठाचे प्रवक्ते म्हणाले की, इस्कॉनवर भारतात बंदी घालण्यात यावी. इस्कॉनने ९ नोव्हेंबर रोजी ह्युस्टनमध्ये रथयात्रेचे आयोजन केले होते. या रथयात्रेमुळे इस्कॉनवर टीका होत आहे. खरं तर, इस्कॉनने आधीच ओडिशा सरकार आणि पुरीच्या गजपती महाराजांना नियोजित वेळेशिवाय रथयात्रा […]