Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

दिवाळीनंतर ‘मिशन अंधत्वमुक्त महाराष्ट्र

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

टाळता येणारे अंधत्व रोखणाऱ्या मिशनची सूत्रे डॉ. तात्याराव लहानेंकडे

वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

मुंबई : टाळता येणाऱ्या अंधत्वापासून महाराष्ट्र मुक्त करण्याचे मिशन राज्य सरकारने हाती घेतले असून या मिशनची सूत्रे ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाती दिली आहेत. दिवाळी होताच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे मिशन सुरू होईल आणि लाखो रुग्णांच्या आयुष्यात येऊ घातलेले अंधत्व रोखले जाईल.

मोतिबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा आणि मधुमेह यामुळे अंधत्वाचा धोका अटळ असतो. मात्र, वेळीच उपचार केले तर हा धोका म्हणजेच हे अंधत्व टाळताही येते. हे उपचार अशा रुग्णांपर्यंत तातडीने पोहोचवणे हाच या मिशनचा मुख्य गाभा असेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टाळता येणाऱ्या अंधत्वपासून महाराष्ट्र मुक्त मिशन जाहीर करताना या मिशनचे सर्वाधिकार डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाती सोपवले. देशात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून २०१७ साली मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशन हाती घेण्यात आले होते. डॉ.लहाने यांचे हे मिशन देशपातळीवर स्वीकारले गेले. डॉ. लहाने हे नेत्रशस्त्रक्रियांच्या विक्रमासाठीच ओळखले जातात, याची नोंद फडणवीस यांनी केली आहे. मोतिबिंदमुक्त मिशनमध्येही आरोग्य खात्यासह विविध विभागांना एकत्र आणण्यात आले होते. त्यानुसारच अंधत्वमुक्त महाराष्ट्र मिशनसाठी सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सर्व सुविधा या मिशनमध्ये एकत्र आणण्याचे अधिकार या मिशनला देण्यात आले आहेत. या मिशनसाठी आवश्यक असलेले सर्व अतिरिक्त सहाय्य सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास मंत्रालयाकडूनही दिले जाईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले आहे.

दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे टाळता येणारे अंधत्व रोखणारे मिशन सुरू केले जाईल. तत्पूर्वी या मिशनची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल, अशी प्रसिद्धी देखील अपेक्षित असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

•डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या आकडेवारीवरून अंधत्व रोखणारे

हे मिशन किती जणांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणार आहे याचा अंदाज येतो. भारतात आजघडीला १.३ कोटी मोतिबिंदूचे रुग्ण आहेत. यापैकी १७ लाख रूग्ण महाराष्ट्रात असू शकतात. त्यांचे निदान होऊन उपचार झाले तर मोतिबिंदमुळे येऊ घातलेले अंधत्व रोखले जाईल. काचबिंदूचीही तीच स्थिती आहे. महाराष्ट्रभरात काचबिंदूचे किमान ८० हजार रुग्ण असू शकतात. त्यांचे निदान होऊन उपचार होणे आवश्यक आहे. अन्यथा, अंधत्वाचा धोका संभवतो. हा धोका टाळण्याचे काम हे मिशन करेल.

महाराष्ट्रात २५ लाख लोकसंख्य २ मधुमेहाने ग्रस्त आहे. मुंबई तर देशाची मधुमेही राजधानी मानली जाते. मधुमेह झालेल्या रुग्णांना साधारण १० वर्षांनी अंधत्व येऊ शकते. डोळ्यांमागील पडदा म्हणजे रेटिना कमजोर होऊन रक्तस्राव होतो आणि अंधत्व येते. मधुमेहाचा हा दुष्परिणाम वेळीच लेसर उपचार केले तर निष्प्रभ ठरवता येते. म्हणजेच अटळ अंधत्वही रोखता येते. तिरळेपणामुळे एक डोळा अंध होणे ही साहजिक प्रक्रिया आहे. सारे काम एकाच डोळ्याने होत असल्याने अजिबात काम न करणारा हा तिरळा डोळा, त्याला आळशी डोळाही म्हणतात, शेवटी अंध होतो. महाराष्ट्रात अशा रुग्णांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. तेदेखील या मिशनमध्ये केले जाईल.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

वयानुसार झोप किती असावी?
चीनची नजर पाकच्या गाढवांवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

CRYOGENIC TECHNOLOGY (क्रायोजेनिक तकनीक) : भारत के गर्व और स्वाभिमान की कहानी

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

2050 में जल संकट का सामना करने का अनुमान अध्ययन

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

विजेपासून बचावासाठी वरदान आहे भारत सरकारचे ‘दामिनी’ ॲप

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पुढील वर्षी होऊ शकते जनगणना !

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »