Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र

कर्करोग होण्याचा धोका या गोळीमुळे थांबविता येणार

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

टाटा इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांचे संशोधन FSSIच्या परवानगीची प्रतीक्षा

कर्करोगाच्या जीवघेण्या त्रासातून मुक्त करणारी रेस्वेराट्रॉल व आर प्लस सीयू नावाची गोळी मुंबईतील कर्करोग संशोधन केंद्र असलेल्या टाटा इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी तयार केली आहे. केवळ शंभर रुपये किंमत असलेल्या या गोळीमुळे रुग्णाला पुन्हा कर्करोग होण्याचा धोका संपुष्टात येणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसआय) मंजुरीनंतर या गोळीचा वापर रुग्णांसाठी केला जाणार आहे. (The risk of cancer can be stopped by this pill)

डॉक्टरांनी विकसित केलेली गोळी अन्ननलिका, फुफ्फुस व मुख कर्करोगाच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या गोळीला विकसित करण्यासाठी संशोधकांना दहा वर्षांचा कालावधी लागला. संशोधक डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाला दुसऱ्यांदा कर्करोग होण्याचा धोका या गोळीमुळे थांबविता येणार आहे. केमोथेरपीमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम ५० टक्के कमी करता येईल.

उंदरांसह मानवावर यशस्वी प्रयोग : टाटा मेमोरियल रुग्णालयाचे वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बडवे यांनी सागितले की, या गोळीचा प्रयोग उंदरांसह मानवावर यशस्वी झाला आहे. संशोधनावेळी उंदरांमध्ये कर्करोगाच्या पेशी विकसित करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यात गाठ तयार झाली. त्यानंतर उंदरांवर किमोथेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. उपचारावेळी कॅन्सर पेशी क्रोमेटिन कणात परिवर्तित झाल्याचे लक्षात आले. हे कण रक्तातून शरीराच्या इतर भागात पोहोचले. यावेळी उंदरांना रेस्वेराट्रॉल व आर प्लस सीयू नावाची गोळी गोळी देण्यात आली. ज्यामुळे क्रोमेटिन कणांना नष्ट करण्यात यश आले.

केमोथेरपीचे दुष्परिणाम रोखणार : ही गोळी ऑक्सिजन रेडिकल्स सोडते.. त्यामुळे रक्तवाहाचा वेग वाढतो. ही गोळी केमोथेरपीमुळे शरीरावर झालेल्या दुष्पपरिणामांवर प्रभाव करते. कॅन्सर उपचारावेळी रुग्णांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम ५० टक्क्यापर्यंत कमी करता येईल तसेच रुग्णाला पुन्हा कर्करोग होण्याचा धोका राहणार नाही. ही गोळी जून, जुलैपर्यंत उपलब्ध होऊ शकते. एका गोळीची किंमत शंभर रुपये राहणार असल्याचे डॉ. बडवे यांनी सांगितले. गोळीच्या दुष्परिणामाचे परीक्षण उंदीर आणि मानवावर करण्यात आले. संशोधनावेळी अनेक आव्हाने आली होती. अनेकदा निराशाही आली मात्र संशोधन यशस्वी झाल्याचा आनंद असल्याचे डॉ. बडवे म्हणाले. (वृत्तसंस्था)

In आरोग्य बातमी महाराष्ट्र

Post navigation

‘जगातील लोकांनी जम्मू-काश्मीरचे सौंदर्य अनुभवावे’
आनुवंशिक आजार बाळाच्या जन्माआधीच रोखता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, गायीला दिला ‘राज्य माते’चा दर्जा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज; फक्त कर्जवसुली स्थगिती पुरेशी नाही – पवार

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

Lover killed mother-in-law | सुनेच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने प्रियकराने केली सासूची हत्या, तोंडात गोळ्या घालून खून

  • काव्याधारा
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

वऱ्हाडी बोलीभाषेतील लघुकथा  :  बझार

February 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
26272829  
« Jan   Mar »