Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

राज्यांतील अधिकाऱ्यांची विचारसरणी अजूनही लायसन्स राजसारखीच

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांची खंत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुधारणा करूनही राज्यांतील अधिकारी अजूनही ‘परवाना आणि नियंत्रण राज’च्या काळात असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात काम करूनही विकास दर वाढन्यामध्ये अडथळे येत असल्याची खंत देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकार व्यवसाय क्षेत्रातील वातावरण सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यामुळे व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने देशाच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. हे सर्व प्रयत्न भारतामध्ये व्यवसाय करणे सुलभ व्हावे आणि उत्पादन क्षेत्रात अधिक स्पर्धात्मक राहण्यासाठी करण्यात येत आहेत; पण दुर्दैवाने त्याचे अपेक्षित परिणाम अद्याप दिसत नाहीत, याबद्दल भार्गव यांनी एका कार्यक्रमात बोलताना नाराजी व्यक्त केली. उत्पादक आणि उद्योजकांच्या मोठ्या वर्गाचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी जास्त संबंध असतात. मात्र केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारे आणि त्यांचे अधिकारी यांच्या कामाच्या पद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. निर्णयांमध्ये खूप विलंब होतो. राज्यातील बहुतांश लोक वेळेला फारसे महत्त्व देत नाहीत. त्यामुळे प्रशासनाची वृत्ती परवाना आणि नियंत्रणाच्या काळात होती तशीच आहे, याकडे भार्गव यांनी लक्ष वेधले. उद्योजकही बऱ्याच प्रमाणात परवाना राजच्या काळात निर्माण झालेली मानसिकता अनुसरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी खासगी क्षेत्र परवान्याच्या अटींनी बांधले गेल्याने ते विकसित होण्याच्या किंवा नवनिर्मितीच्या स्थितीत नव्हते; पण परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल असताना मारुती कंपनी पुढे जाण्यात यशस्वी ठरली, असे भार्गव यांनी सांगितले.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

आजारी पेन्शनधारकांच्या घरी जाऊन हयातीचा दाखला घ्या! बँकांना केंद्र सरकारचे निर्देश, डिजिटल दाखल्याबाबत जनजागृती करा
निद्रानाश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

गांधी पीस फाउंडेशनने केला ज्येष्ठांचा सन्मान

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

“सत्कार प्रतिभेचा सन्मान कवीचा ” या सत्कार समारंभाचे आयोजन

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन; दि.३१ जुलै २०२३ अंतिम मुदत

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

तुम्हाला ओटी कोर्सबाबत माहीत आहे का?

September 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Aug   Oct »