राज्यातली शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज होईल. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील तर परीक्षा परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव असतील. याशिवाय इतर ३ सदस्य या समितीत असतील. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही […]
Category: महाराष्ट्र
New Era High School | गुरु-शिष्य नात्याचा साक्षीदार ठरलेला न्यू ईरा हायस्कूलचा स्नेहमिलन सोहळा
अकोला : प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित न्यू ईरा हायस्कूल, दामले चौक, रामदासपेठ येथे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य व ऐतिहासिक स्नेहमिलन सोहळा दिनांक २७ डिसेंबर रोजी अत्यंत उत्साही, भावनिक व स्मरणीय वातावरणात पार पडला. अनेक दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटविला.#New Era High School […]
डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार
नवी दिल्ली : जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुका (IUCAA)चे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमात देशभरातील एकूण ८ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री, १३ जणांना विज्ञान युवा, तर एका […]
नववर्षाच्या पहिल्या दिवशी या ५ चुका टाळा, नाहीतर वर्षभर अडचणींचा सामना करावा लागू शकतो
नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदल नाही, तर नवीन आशा आणि संकल्पांची सुरुवात आहे. ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेमध्ये, वर्षाचा पहिला दिवस, १ जानेवारी हा खूप खास मानला जातो. विद्वान म्हणतात की वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेली प्रत्येक कृती पुढील ३६५ दिवसांचे भाग्य आणि दिशा ठरवते. म्हणूनच शास्त्रांमध्ये या दिवशी काही विशिष्ट […]
जपानमध्ये एआय नवऱ्याशी लग्न; ३२ वर्षीय महिलेच्या अनोख्या निर्णयाची जगभर चर्चा
जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) झपाट्याने प्रगत होत असताना, जपानमधील एका ३२ वर्षीय महिलेने एआयद्वारे तयार केलेल्या जोडीदाराशी लग्न करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. युरिना नोगुची असे या महिलेचे नाव असून, तिने चॅटजीपीटीच्या साहाय्याने स्वतःचा एआय पार्टनर तयार केला आहे. युरिनाने आपल्या एआय जोडीदाराला ‘क्लाऊस’ असे नाव दिले आहे. क्लाऊससोबत […]
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका १ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान
मुंबई, दि.२३ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी, २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठविता येणार […]
अकोला महापालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, राजकीय हालचालींना वेग
अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होत असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांप्रमाणेच अकोला महापालिकेची निवडणूकही ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांना ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर […]
९९ वे अ. भा. साहित्य संमेलन साताऱ्यात
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान ऐतिहासिक सातारा नगरीतील शाहू स्टेडियम येथे होणार असून साहित्य अकादमी सन्मान विजेते विश्वास पाटील संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मावळा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. गुरुवार १ जानेवारी […]
बांगलादेशातील परिस्थिती भारतासाठी १९७१ नंतरचे सर्वात मोठे आव्हान : थरूर समितीचा इशारा
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने इशारा दिला आहे की बांगलादेशातील सध्याची परिस्थिती भारतासाठी १९७१ नंतरचे सर्वात मोठे धोरणात्मक आव्हान ठरू शकते. समितीच्या मते, बांगलादेशातील वाढती अस्थिरता ही इस्लामिक कट्टरपंथीयांचा उदय, चीन आणि पाकिस्तानचा वाढता प्रभाव आणि शेख हसीनांच्या अवामी लीगची पकड कमकुवत होणे या कारणांमुळे निर्माण झाली […]
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा
सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे, नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. हा राजीनामा पुढल्या […]
