वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अहमदनगर : पत्रकार संरक्षण कायद्यविषयी फार मोठा गवगवा झाला असला तरी कार्यवाही झालेली दिसत नाही. म्हणून सर्व माहीती घेऊन पत्रकार संरक्षण कायद्यविषयी पाठपुरावा करू, असे ठोस आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांच्यासह शिष्टमंडळाने राळेगणसिध्दी येथे अण्णांची भेट घेत पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या विविध समस्या बाबत चचा केली. अण्णा हजारे यावेळी बोलताना म्हणाले की, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपण सैदव तत्पर असून शासनाने याबाबत काय भूमिका घेतली याचीही माहीती घेऊ. कारण लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणजे पत्रकार असतो. मात्र शासनकर्त्यांची मानसिकता चांगली असावी लागते पत्रकारांच्या कायद्याविषयी दूर्लक्ष करून शासन काय साध्य करणार असा सवाल करत अण्णा पुढे बोलताना म्हणाले की वेळप्रसंगी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण आग्रभागी राहु असे ते म्हणाले. डॉ.विश्वास आरोटे यावेळी अण्णाशी चर्चा करताना म्हणाले की, कोरोनाकाळामध्ये पत्रकारांनी जीव धोक्यात घालुन साथरोग नियंत्रण करण्यासाठी प्रबोधन केले राज्यात सुमारे २४० पत्रकारांचा कोरोनाने बळी घेतला तात्कालिन अरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच देण्याचे जाहीर केले. मात्र ती घोषणा कागदावरच राहिली त्या मयत पत्रकारांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या नवीन कामगार धोरणातुन पत्रकाराना वगळले असून या कायदयावर हरकत घेणार असून अण्णा हजारेकडे पाठबळ देण्याची विनंती केली.