राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्काराचे वितरण

अकोला : अकोला येथील खडकी बायपास येथील हॉटेल नैवेद्यमच्या हॉलमध्ये तरुणाई फाउंडेशन कुटासा आयोजित राज्यस्तरीय विविधक्षेत्र गुनिजन निमित्ताने महाराष्ट्रातील सामाजिक, कला, साहित्य, शैक्षणिक, आरोग्य, उद्योजक, आध्यात्मिक, पत्रकारिता, अभिनय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक युवतींना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी बोलताना आ. मिटकरी म्हणाले इथे बसलेल्या सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या युवक युवतीनी हा पुरस्कार घेतल्यानंतर त्यांची जबाबदारी ही शंभर टक्क्यांनी वाढही असून त्यांनी आपापल्या क्षेत्रात् जाऊन कार्य करावे. पुरस्काराने कार्याला अधिक गती प्राप्त होते असे प्रतिपादन या वेळी बोलतांनी मिटकरी यांनी केले. त्यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ साहित्यिक नारायण अंधारे, कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्रा डॉ सुहास उगले तर प्रमुख अतिथी महणून प्रतीक पाटील, वानखडे, प्रदीप गुरुखुद्दे, ॲड. सुमित बजाज, स्वागत अध्यक्ष प्रा देवानंद गावंडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या पुरस्कार त्यामध्ये प्रामुख्याने प्रवीण ठाकरे, सौ जयश्री पवार, अमित देशमुख रायगड, डी आर देशमुख, प्रा अमोल बोपटे, महादेव लुले, जया भारती इंगोले, डॉ रूपाली सावळे, कु सुरभी दोडके, पुनम भगत, सुमित नवलकर, अमित वाहूरवाघ, आकाश कवाडे, अमरदीप सदाशिव, विशाल राजे बोरे, मनीष मोडक, वैभव इंगळे, युवराज टोपले, रोहिणी वानखडे , योगेश लबळे, आकांक्षा गोमासे, आकाश हरणे, बाळू ढोले, सौरभ वाघोळे, देवानंद मुरूमकार, माया इरतकर, विकास कुलट, पुरणाजी खोडके आदींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र श्रीफळ शाल देऊन आमदार मिटकरी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन गणेश मेनकार यांनी तर आभार प्रदर्शन तुळशीदास खिरोडकर यांनी केले. कार्यक्रमासाठी पिंपळकर, प्रशांत वरळीकर, गोपाल मुकुंदे, गोपाल मापारी आदींनी परिश्रम घेतले.