पडलेल्या सुर्य प्रकाशापैकी ८७ टक्केहून अधिक प्रकाश वापरण्यायोग्य ऊष्मा ऊर्जेत रूपांतरित करणारे संशोधन आयआयटी मुंबईने केले आहे. झेंडूच्या फुलासारखी नॅनो रचना असलेले हे मटेरियल सौर ऊष्मा शोषण्यात अधिकवेगवान असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले आहे. ही उर्जा सामान्य तापमानाला असलेली हवा ६० डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करता येते आणि कोणत्याही प्रकारचा धूर […]
Category: बातमी
कोरोना लस शोधणारे शास्त्रज्ञ कॅटलिन, वेसमन यांना नोबेल
वृत्तसंस्था मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानाद्वारे कोरोना लस संशोधनात मोलाची कामगिरी बजावून जगाला मृत्यूच्या कराल दाढेतून बाहेर काढण्यात योगदान दिलेले शास्त्रज्ञ कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. १ दशलक्ष डॉलर्सच्या रोख रकमेसह स्मृतिचिन्ह देऊन उभयतांना १० रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यावेळी कोविड- १९ ने जगाला विळखा […]
चाण्यक्यनीति
रूप आणि तारुण्य या दोन्हीही गोष्टींनी संपन्न असून उच्च कुळांत जन्म असूनही जर मनुष्य विद्याविहीन असेल तर तो शोभून दिसत नाही. ज्याप्रमाणे सुगंध नसलेले चाफ्याचे फूल असते त्याचप्रमाणे हा असा मनुष्य असतो. ही अशी स्थिती आजकालही दिसून येते. निसर्गात तयार होणारी सोनचाफ्याची फुले कितीही सुंदर आणि सुगंधी असली तरी […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात दै देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश
अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या कोरोना काळात स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त करणाऱ्या पत्रकारांच्या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत अकोला येथील दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक ,एक आक्रमक शेतकरी नेते श्री. प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश झाला आहे.ते इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी […]
निद्रानाश !
कुंभकर्णाचा ब्रह्मदेवाला वर मागताना संभ्रम झाला. त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितले आणि तो 6 महिने झोपून राहायचा. हल्ली आपली मात्र निद्रा नीट होत नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी आपला गोंधळ उडतो, आपण संभ्रमात राहतो. जीवनातील एक तृतियांश वेळ झोपेत जाते. ती जीवनातील अती आवश्यक गरज आहे, पण बरेच लोक निद्रेला प्राधान्य देत […]
राज्यांतील अधिकाऱ्यांची विचारसरणी अजूनही लायसन्स राजसारखीच
मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांची खंत नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुधारणा करूनही राज्यांतील अधिकारी अजूनही ‘परवाना आणि नियंत्रण राज’च्या काळात असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात काम करूनही विकास दर वाढन्यामध्ये अडथळे येत असल्याची खंत देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी व्यक्त […]
आजारी पेन्शनधारकांच्या घरी जाऊन हयातीचा दाखला घ्या! बँकांना केंद्र सरकारचे निर्देश, डिजिटल दाखल्याबाबत जनजागृती करा
नवी दिल्ली: आजारी आणि रुग्णालयात दाखल असलेल्या निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँकांत बोलावण्याऐवजी बँकांनीच आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचावे, असे निर्देश केंद्र सरकारने पेन्शन वितरण करणाऱ्या सर्व बँकांना दिले आहेत. ८० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या अतिज्येष्ठ पेन्शनधारकांना डिजिटल माध्यमातून हयातीचा दाखला सादर करण्यासंदर्भात जागृती करावी, असेही सरकारने बँकांना […]
मृत्यूपत्राचे महत्व !
कोरोना महामारीमध्ये मृत झालेल्या अनेक नागरिकांचा घरात प्रॉपर्टीवरून खूप वाद सुरू आहेत आणि अनेक प्रकरणे कोर्टातसुद्धा गेलेली आहेत, असा एक सर्वे नुकताच वाचण्यात आला. सीमा (नाव बदलेले) एक माझी अशील एकदा माझ्याकडे आली आणि म्हणाली की, मी माझ्या आईची गेल्या १० वर्षांपासून खूप सेवा केली, परंतु आईने तिच्या मृत्यूपत्रात मला […]
अणुबॉम्बच्या निर्मात्याची दुर्दैवी गोष्ट
ऑगस्ट १९४५. दुसरा आठवडा. या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी जगाच्या इतिहासाचा चेहरामोहराच बदलून टाकला. या घटना घडल्या जपानमध्ये. पण त्याने आख्खं जग हादरून गेलं. या घटना म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेला अणुबॉम्ब हल्ला. या हल्ल्यानंतर अमेरिकेचा महासत्ता बनण्याचा मार्ग आणखीनच सोप्पा झाला. अणुबॉम्बची ताकद आणि दहशत जगाला समजली. त्यानंतर आपल्याकडेही […]
चांद्रमोहिमेची गरुडझेप
चांद्रयान- ३ मोहिमेचा उद्देश मागच्या अभियानाप्रमाणेच चंद्रावरच्या वातावरणाचा अनुभव घेणे, तेथील भूकंपीय हालचालींचे आकलन करणे आणि संभाव्य खनिज पदार्थांचा शोध लावणे, हा आहे. भारताचा पुढील टप्पा मानव अभियानाचा आहे. यात आपण यशस्वी ठरलो तर देशाच्या अंतरिक्ष इतिहासात मैलाचा दगड ठरेल. आगामी काळात भारताला अंतरिक्ष मोहिमा वाढवाव्या लागतील. भारताने अधिकाधिक शिक्षण […]
