वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
लोकनायक जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते होते. बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे त्यांचा दि.११ ऑक्टोबर १९०२ रोजी जन्म झाला. तेथेच प्राथमिक व पुढे पाटणा येथे माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले. वयाच्या अठराव्या वर्षी प्रभावतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील एक राष्ट्रीय नेते व प्रसिद्ध वकील होते. त्यांनीच चंपारण्यातील अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी गांधीजींना बिहारमध्ये येण्यास पाचारण केले. प्रभावतीदेवींमुळे गांधीजींशी प्रथमपान त्यांचा निकट संबंध जोडला गेला. इंटरमध्ये असताना त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला, १९२२मध्ये ते अमेरिकेत गेले, विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशाखातील एम.ए. पदवी त्यांनी घेतली. १९२१ मध्ये ते भारतात परत आले. अमेरिकेतच जयप्रकाशांचा मावसबादी विचारांशी परिचय झाला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा आफ्टरमाथ ऑफ दी जॉन को-ऑपरेशन हा निबंध व मार्क्स, लेनिन, ट्रॉयकी यांचे साहित्य वाचून से कहर मार्क्सवादी बनले, गांधींची विचारप्रणाली व कार्यपद्धती यासंबंधी काही काळ ते असमाधानी होते. तथापि काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीसंबंधीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेशीही ते सहमत नव्हते. मावसंवाद्यांनी मध्यमवर्गीयांशी सहकार्य करावे, त्यांनी चालविलेल्या वसाहतीमधील राष्ट्रीय चळवळीतून अंग काढून एकाकी पडू नये, या सेनिनच्याच मताचे ते होते. म्हणून भारतात परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९३०मध्ये जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी जयप्रकाशांना काँग्रेसच्या कामगार विभागाचे प्रमुख नेमले. गांधीजी गोलमेज परिषदेन परत आल्यानंतर झालेल्या सत्याग्रह-चळचळीच्या दुसन्या पर्यात सर्व पुढारी तुरुंगात असताना त्यांनी चळवळीची सूत्रे सांभाळली. १९३३मध्ये मद्रास येथे त्यांना अटक होऊन एक वर्षांची शिक्षा झाली. अन्य समाजबादी तरुणांच्या सहाय्याने आणि सहकार्याने त्यांनी १९३४मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांनाच या पक्षाचे सरचिटणीस म्हणून नेमले गेले. आपल्या भूमिकेची सांगोपांग चर्चा त्यांनी व्हाय सोशलिझम या पुस्तकात केली आहे. भारतीय कम्युनिस्टांनी काँग्रेसला राष्ट्रीय आघाडी म्हणून मान्य केल्यामुळे त्यांना समाजवादी कम्युनिस्ट संयुक्त दलाची शक्यता वाटू लागली; म्हणून प्रमुख सहकाऱ्यांचा विरोध असतानाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर त्यांनी समझोता केला. पंतु, ही एकता फार काळ टिकली नाही. १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले, तेव्हा त्यांनी युद्धविरोधाचे व स्वातंत्र्यलढा करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे त्यांना अटक होऊन नऊ महिन्यांची शिक्षा झाली. १९४२मध्ये पुन्हा त्यांना अटक करून राजस्थानमधील देवळी तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे राजयद्यांसोल अन्यायाविरुद्ध महिनाभर उपोषण करून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास त्यांनी भाग पाडले.
जयप्रकाशांच्या प्रयत्नाने १९६४मध्ये भारत सरकार व नागा बंडखोर पुढारी यांत युद्धविराम तहावर सह्या झाल्या. १९६५मध्ये त्यांना शांतता कार्याबद्दल रेमन मागसाय हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७०मध्ये त्यांनी बिहारच्या मुझकरपूर जिल्ह्यात दौरा काढून तेथील नक्षलवाद्यांचे हृदयपरिकांन करण्याचा प्रयत्न केला. १९७१मध्ये त्यांनी बांगलादेशातील परिस्थिती जगापुढे मांडण्यासाठी जागतिक दौरा केला आणि त्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नयी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविली, मे १९७२ मध्ये मध्य प्रदेशातील २६७ अल दोडेखोरांनी जयप्रकाशांच्या विनंतीवरून भारत सरकार व मध्य प्रदेश सरकार यांच्यापुढे शरणागती पत्करली होती. त्यांनी संशोधन कार्य करणान्या संस्थाही या काळात स्थापन केल्या. असोसिएशन ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज फॉर रूरल डेव्हलपमेंट, गांधीयन इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज आणि अखिल भारतीय पंचायत परिषद या संस्थांचे ते अध्यक्ष किया मानसेवी संचालक होते. तसेच काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम या वैचारिक व सांस्कृतिक स्वातंत्र्यास वाहिलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते एक संस्थापक व अनेक वयें मानसेवी अध्यक्ष होते. इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीम या संस्थेचे सुरुवातीपासून ते सदस्य राहिले आहेत.
१९४२च्या सुरुवातीस त्यांना बिहारमधील हबारीबाग तुरुंगात हलविण्यात आले. यावेळी बाहेर छोडो भारत आंदोलन सुरू झाले होते. त्यात भाग घेण्यासाठी अत्यंत साहसपूर्ण रीतीने तुम्गाच्या भिंतींवरून उडी मारून ते फरारी झाले व भूमिगत संघटनेचे नेतृत्व का लागले. त्यांनी गनिमी तंत्राने सदनारे आझाद दस्ते संघटित केले. त्यांच्या नेपाळमधील हालचालींचा सुगाया लागल्याने त्यांना नेपाळी पोलीस ब्रिटिश हहीत नेत होते. तेव्हा आझाद दस्त्याच्या सैनिकांनी अचानक हल्ला करून नेपाळी पोलिसांच्या हातून त्यांची सुटका केली. यानंतर ते भारतात परत येऊन भूमिगत राहून कार्य का लागले. त्यावेळी सरकारने त्यांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. १७ सप्टेंबर १९४३ रोजी अमृतसर रेल्वेस्थानकावर त्यांना पकडण्यात आले व तेथून १९४६ साली त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी टूर्वा स्ट्रगल हे पुस्तक प्रसिद्ध कान राष्ट्रीय चळवळीची कारणमीमांसा केली.
ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या वाटापार्टीना, ब्रिटिश सरकारने नेमलेल्या संविधान परिषदेला तसेच देशाच्या फाळणीला जयप्रकाशांचा विरोध होता. अखेर म.गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये राहून समाजबादी समाजरचनेचे ध्येय साध्य होणार नाही; म्हणून त्यांनी १९४८मध्ये अन्य सहकान्यांच्या मदतीने स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना करून काँग्रेसला पर्यायी पक्ष निर्माण केला. पक्षाने नैतिक मूल्यांना सर्वोच्च स्थान द्यावे, साधनशुकिोचे महत्व मानाचे, सवा धारण करणाऱ्यापेक्षा सेवा करणाऱ्यांची प्रतिष्ठा अधिक मानावी, असे आपल्या कार्यकत्यांना त्यांनी आवाहन केले. त्यांची भूमिका लोकशाही समाजवाद्यांची झाली होती. हिंसेपेक्षा गांधीप्रणीत सत्याग्रहतंत्राचा समाजवाद्यांनी अवलंब करावा, ही त्यांची विचारसरणी पक्षाने स्वीकारली. पक्षाचे पहिले सरचिटणीस महणून त्यांचीच निवड झाली. त्यांनी १९५३ नंतर मिोबाजींच्या भूदान आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली. १९ एप्रिल १९५४मध्ये बोधगया वेथील सर्वोदय संमेलमात भूदान कार्यासाठी पक्षीय राजकारणातून त्यांनी संपूर्णतः अंग काढून घेतले. त्यांनी अप्ली फॉर दी रिकस्ट्रक्शन ऑफ इंडियन पॉलिटी व फ्रॉम सोशलिझम टू सों दय ही पुस्तके लिहिली. १९६१च्या सर्वोदय संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना आपल्या राजकारण-संन्यासाच्या मर्यादाही त्यांनी स्पष्ट केल्या होत्या. पक्षीय राजकारणाचा त्याग म्हणजे देशातील घडामोडींसंबंधी उदासीन राहणे नव्हे; उलट राष्ट्रीय जीवनात अधिक परिणामकारक व अधिक रचनात्यक भाग घेण्यासाठी पक्षीय वसतात्मक राजकारणातून आपण दूर झालो आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. १९५४ ते १९७२पर्यंत जयप्रकाश भूदान आंदेलपातच मग्न होते. परंतु या काळातही त्यांनी काही महत्त्वाची राजकीय कामे केली. १९६०मध्ये नवी दिली येथे त्यांनी तिबेटच्या प्रश्नांवर आफ्रो-आशियाई परिषद भरविली. १९६२मध्ये पाकिस्तानबरोबर पुन्हा स्नेहसंबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने पाकिस्तान रिकन्सिलिएशन गुप स्थापन केला; नागालैंडमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या शांतता मंडळाचे ते सदस्य होते.
प्रभावतीदेवी १५ एप्रिल १९७३ मध्ये निधन पावल्यानंतर जयप्रकाश यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यांना मधुमेहाचा व रक्तदाबाचा विकार जडला. १९७०पासून भूदान आंदोलनाबद्दल त्यांना असमाधान बाटू लागले. भूदान आंदोलनात केवळ अनुनयावर भर आहे. पण त्यांतून फलनिष्पत्ती होत नाही, असे अनुभवास आल्यामुळे अनुनय अयशस्वी ठरला, तर गांधीप्रणीत अहिंसात्मक असहकार अथवा प्रविकाराचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी भूमिका ते घेऊ लागले. या प्रत्रावर आचार्य मिोबांशी त्यांचे मतभेद झाले. देशातील सर्वका प्राचार, दुबळ्या घटकांच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष इ. प्रत्रांनी अस्वस्थ होऊन त्यांनी देशाला सर्वका ब्रांतीची गरज आहे ही भूमिका घेतली व त्यानुरुप गुजरात राज्यातील राजकीय सतांतर व बिहारमधील आंदोलन यांचा पुरस्कार केला. २५ जून १९७५पासून देशात आणीबाणी जाहीर झाली व त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आले. पुढे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. जयप्रकाश मावर्सवाद, लोकशाही, समाजवाद या मार्गानी सर्वोदयाकडे वळले होते. परंतु या सर्व विचार परिवर्तनात त्यांचा क्रांतीवरील विचार दळलेला नवाता. शेवटी त्यांनी दि.८ ऑक्टोबर १९७९ रोजी कायमचा जगाचा निरोप घेतला.
एन. के. कुमार गडचिरोली